मला भावलेले प्रा. मुकुंद सावंत
परिचय
प्रा.
मुकुंद सावंत सर आणि मी धारूर महावीद्यालयात एकाच वर्षी रुजू झालोत ते वर्ष म्हणजे
१९९२. माझी नेमणूक त्यावेळी अस्थायी स्वरुपाची होती तर सावंत सर गंगापूरच्या
मुक्तानंद महाविद्यालयातून बदली होऊन इथे आले होते. प्रा. मुकुंद सावंत सर हे
त्यावेळी धारूरचे नगराध्यक्ष म्हणून
नगर पालिकेवर निवडून आले होते. मी त्यावेळी अत्यंत नावाखा
असल्यामुळे त्यांच्याशी तसा माझा जास्त परिचय नसला तरी त्यांनी त्यावेळी राजकारणात
केलेला बंडखोरी आणि त्यांचे समाजातील स्थान यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक
वेगळेच आकर्षण होते. त्याच दरम्यान त्यांच्याकडे झालेली चोरी, त्यांना आलेले हृदयविकाराचा
आलेला झटका यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणखीच लक्षवेधी झाले आणि त्यांचा परिचय व्हावा असे वाटू लागले.
हळू हळू
मीही महाविद्यलयात रमू लागलो, दुपारनंतर आमची स्टाफरूम मध्ये भेट होऊन चर्चा होऊ लागली. कधी मतभिन्नता तर कधी
त्यांचे विचार मला पटू लागले. नंतर आमच्यात बर्यापैकी मैत्री झाली. महाविद्यालयाचे
प्रश्न, विज्ञान शाखेचे अनुदान, मुंबईचे जीवन,
राजकीय चर्चा, सामाजिक प्रश्न, आहार
यावर तासंतास आम्ही चर्चा करत असू. सुरुवातीच्या काळात टे मांसाहारी
आहारावर खूप तिखट शब्दात टीका करत नंतर टे आमच्यासोबत जावू लागले हा भाग वेगळा.
दरम्यानच्या काळात आमचा स्नेह वादात गेला आणि आमची बऱ्यापैकी घनिष्ट मैत्री झाली.
विद्यार्थी प्रिय आणि
व्यासंगी शिक्षक
दुपारच्या
सत्रात आम्ही स्टाफ रूम मध्ये चर्चा करत बसत असू. शिक्षण क्षेत्रातील प्रश्ना
संबंधी त्यांची मत अन तळमळ मलाच नाही आम्हा विज्ञान शाखेतील सर्वांना प्रभावित करू लागली. त्यांच्यातल खरा शिक्षक
आम्हाला लक्षात येऊ लागला. प्रा. मुकुंद सावंत सर नियमित तासिका घेत असत. नगराध्य
पदावर काम करत असताना असो कि प्राचार्य पदावर कार्यरत असतानाही त्यांनी कधी तासिका
न घेतल्याले आठवत नाही. चर्चे अंती ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याचे लक्षात
आले. धारूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतचे सर्वच प्राध्यापक हे नियमित अन
विद्यार्थी प्रिय असल्याचे निदर्शंस आले. त्यामुळे वाणिज्य शखेत नियमित येणाऱ्या
मुलांचे संख्याही भरपूर असायची आणि निकालही उत्तम लागावयाच. सार्वजनिक जीवनात सक्रीय असूनही सावंत सर त्याला अपवाद
नव्हते. सावंत सरांच्या तासाला भरपूर मुल-मुली उपस्थित असायच्या आणि सरही मुलांना आवडीने अन तन्मयतेने शिकवायचे.
शिक्षणाती नवे प्रवाह, आधुनिक अध्यापण
पधत्ती यांचा ते वापर करून ते विद्यार्थ्यांना मनापासू
शिकवत असत. सावंत सर आमच्यासाठी एक आदर्श शिक्षक म्हणून आम्हा नवीन लोकांना
नेहमीच प्रेरणा देत राहिले.
कुशल प्रशासक
दरम्यानच्या काळात डॉ.
बाबासाहेब कोकाटे यांनी प्राचार्य पद सोडल्या नंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक
मंडळाने त्यांच्यावर धारूर महाविद्यालयाच्या प्रभारी पदाची जिम्मेदारी सोपवली .
त्या संदर्भात संस्थे कडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी ग्रंथपाल देशपांडे सर आणि
ईतर काही वरिष्ठ सहकार्यासोबत चर्चा करून जिम्मेदारी घेण्याची तयारी दर्शवली. अश्या प्रकारे प्राचार्य पदाच्या कार्यकाळात
त्यांनी महाविद्यलयात एक चांगली टीम निर्माण केली आणि सर्वांना आपुलकीने कामाला
लावले. अर्थात वेळप्रसंगी त्यांनी कठोर भूमिका घेऊनही आपली प्रशासकिय चुणूक द्खून
दिली. नक चे काम, हिंदीचे राष्ट्रीय चर्चा
सत्र, विद्यापीठ अनुदान आयोगाचे वसतिगृहाचे बांधकाम, शेतकरी परिषद व इतर अनेक
उपकराचे यशस्वी आयोजन त्यांच्या प्रशास्कीय कामाचे धोतक आहेत. किती जावाचा मित्र
असेल तरीही तासिकांच्या बातीत त्यांनी कोणाचीही गय केलेई नाही. त्यांच्यात उत्तम
नेतृत्व क्षमता आहे आणि प्रशासनावर
त्यांची मजबूत पकड असल्यामुळे त्यांच्याकडे निर्णय क्षमता असायची अन त्यामुळे
प्रशासन गतिमान व्हायचे. संस्थाचालकांचा संपुर विस्वास, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्यांची,
विद्यार्थाय्न्विषयी तळमळ, पालकांशी असणर सुसंवाद यामुळे त्यांचा प्राचार्य पदाचा
कार्यकाल स्मरणीय राहिला.
प्रेमळ, कुटुंब वत्सल आणि
व्यवहार चतुर
सार्वजनिक
जीवनात आणि महाविद्यालय वेगवेगल्या जिम्मेदारी आणि आपले सर्व कामकाज नियमित अंत
काटेकोर पाने पारपडणारे प्रा. सावंत आपली व्यक्तिगत अनो कौटुंबिक जीवनातही अत्यंत
यशवी राहिले आहेत. शेती असेल, छोटी-मोठी खरेदीअसेल, बाजारपेठेतील उठ-बस असेल
त्यांच्यातील व्यवहारीकपणा आपल्याला ठळकपणे जाणवतो. ते जिवनात कोणत्याही व्यवहारात
आपल्याला यशस्वी झालेले दिसतील. खरेतर तो व्यवसायिकपणा धारूरच्या मातीतच आहे सावंत सरही त्याला अपवाद नाहीत त्यामुळे सावंत
सरांनी कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम ठेवली आहे. मुळात संवेदनशील असणारे
सावंत सर अत्यंत कुटुंब वत्सल आहे. आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत व्यवस्थित पार पडल्या
आहेत. सावंत सर नेहमीच आपल्या मित्र परिवार आणि सहकार्याशी प्रेमाने
वागताना आढळतात आणि वेळोवेळी गरजेप्रमाणे अनिकांना त्यांनी सहकार्य केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा