शुक्रवार, ४ मार्च, २०१६

किसानपुत्र  आंदोलन
किसान पुत्र बंधू भगिनी … नमस्कार
          भारत हा कृषी प्रधान देश आहे असे म्हटले जाते . परंतु आर्थिक सर्व्हेक्षणानुसार, आपल्या देशातील या भूमिपुत्रांनी  कष्ट आणि प्रयोगशील पणातून एका बाजूला देशात अन्नधान्याची मुबलकता आणली कृषी उत्पादनांचे अनेक उचांक निर्मान् केले आहेत   आणि त्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला आहे परंतु दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय विकासातला वाटा (GDP 15% )घटत आहे आणि दररोज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेती व शेतकरी आज अत्यंत जटील अवस्थेत  आहेत. सतत पडणारा दुष्काळ,नापीक झालेली  शेती,   तरुण होतकरू शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यामुळे  शेतीत आलेले प्रचंड  नैराश्य एका बाजूला आणि उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ट नौकरी असे म्हणत म्हणत स्वत्रन्त्रोत्तर काळात शेतकरी आणि शेतीच्या लुटीचे  तंत्र सक्षम पणे  राबविण्यात आले .  स्वातंत्रोत्तर  काळात हरित क्रांतीआणि धवल क्रांती मुळे देशात अन्नधान्याची मुबलकता आहे आणि त्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला असला तरी शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे 
             नियंत्रणमुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व खाजगीकरण यामुळे इंडियात झालेले उत्साहाचे        वातावरण. प्रगती व विकासाचे निर्माण झालेले स्वप्न आणि त्यातही नोकरदारांचे आर्थिकलाड त्यामुळे आलेली सूज  व दिसणारा झगमगाट मन अस्वस्थ होऊन जायचे, कासावीस होते . भारतीय उद्दोग क्षेत्रात देशी वेदेशी गुंतवणूक होत आहे . शहरात सर्वच क्षेत्रात लोक क्षमतेपेक्षा जास्त कमवताना दिसत अहेत. उदाहरण म्हणून क्रिकेट क्षेत्र असो व चित्रपट क्षेत्र असो, या सगळ्या व्यवसायात प्रचंड पैसा गुंतवल जातो व  उलाढाल होते. खरे तर हि क्षेत्रे खऱ्या अर्थाने संपत्तीची निर्मिती नाही तर फक्त उलाढाल करतात . शेतीमध्ये खऱ्या अर्थाने संपत्तीची निर्मिती होते . परंतु शेतीमध्ये पैसा नाही, शेतीमध्ये मात्र लोक गुंतवणूक करायला  तयार नहित. शेती हा तोट्याचं व्यवसाय झाला आहे . पर्याय म्हणून कोणीही शेतीची उद्दोग म्हणून निवड करत नाही...तर प्रत्येकजण शेतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे 
             स्वतंत्रोतर   काळात  देशातील संपूर्ण शेतकरी कष्टकरी सृजक समाज   देश विकासात सहभाग त्यातून समृद्ध होणारी खेडे आणि शहराची  मर्यादित वाढ याचे एक संतुलित  विकासाचे स्वप्ण  दिसले होते .  परन्तु पुन्हा एकदा कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात, " उषःकाल होताहोता काळरात्र झाली …अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली … " असे म्हणावयाची वेळ आली आहे … चाळीस वर्षापूर्वी शिकत असताना शेतिअर्थक्रान्तिचे प्रेणेते, शेतकऱ्यांचे पंचप्राण   मा . शरद जोशी साहेबांच्या आंदोलने केलेली वैचारिक क्रांती त्यातून  निर्माण झालेली दृष्टी,     इंडियात स्थायिक होऊनही  अस्वस्थ करणारे भारतीयत्व, यामुळे  तुमच्या माझ्या सारखी अनेक किसान पुत्र अस्वस्थ अहेतअशा वेळी  तुमच्या माझ्या सारखी अनेकांना  शेतीची व  शेतकर्यांची हि परवड थांबली पाहिजे असे मनापासून वाटते . त्याच वेळी  किसानपुत्र  आंदोलनाची हाक कानी पडली……  या  किसानपुत्र  आंदोलनाने  एक आशा  निर्माण केली आहे . परंतु  आता काळ बदलला  आहे. रस्ता रोको, संप ,  मोर्चा या प्रकारची आंदोलने आता करावयाची गरज राहिली असे वाटत नाही …. शेतकरी व शेतीविरोधी मानसिकता बदलण्यासाठी सर्वच आघाड्यावर किसान पुत्रांना लढावे लागणार आहे. अन्नधान्य महागाई विरोधी चर्चेत सहभाग, लिखाणाच्या माध्यमातून, नियोजन प्रक्रियेवर परिणाम करणे, शेतकरी विरोधी कायदे  बदलणे अशी आंदोलने करणे. सोशल मिडिया चा वापर  नियंत्रणमुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व खाजगीकरण याचे फायदे शेतीत व ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाला मिळाली पाहिजेत या साठी किसान पुत्रांची सविस्तर चर्चा व्हावी  म्हणून  ….………  

शनिवार, २ मार्च, २०१३

काय लिहावे असे सतत  वाटल्या मुळे बरेच काही लिहिणे राहूण गेले. पण एक मात्र खरे कि माणूस हा सामाजिक प्राणी असल्या मुळे त्याला सतत कोणाशी तरी बोलावेशे  वाटते. माझ्या मते संवाद हा मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यावरचा अत्यंत महत्वा अविष्कार आहे . कदाचित रानाटी  अवस्थेत भिती किंवा गरजेतून संवादाला  सुरुवात झाली आसावी, पण हळूहळू संवाद वाढत  गेला अन ती भावणिक गरज  निर्माण झाल्या मुळे  कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली असावी . त्यातून पुढे टोळी किंवा समुदाय हा पुढला टप्पा विकसित होताना  भाषा आणि संवादाचे महत्व टिकून रहिले. नातेवाईक आप्त इष्ट कुटुंबातील इतर सदस्य यांच्यातील संवाद मानवी संबंधांचे जाले विणत गेला. मागील काळात घड्याळ नव्हते परंतू वेळ होता, आज घड्याळ आहे पण वेळ नाही. म्हणून बोलणे नाही संवाद नहि. त्यातच टिव्ही, इंटरनेट व  मोबाईल मुले घरात सुद्धा कोनी  एकमेकाशि बोलेनाशे झाले आहे.  कुटे तरी एकटेपणाकडे माणसाची वाटचाल होते आहे अशी भीती  वाटते    आहे. म्हणून हे  मुक्तांगण ---------- सर्वांना गप्पा मारण्या साठी निवांत व सतत उपलब्ध असणारा कट्टा ---------या आपण पुन्हा बोलत राहू सुख -दु:ख वाटून घेऊ----चला बोलते होऊ ………. ………………. राम चव्हाण