रविवार, ३ एप्रिल, २०१६

शेतकरीविरोधी कायदे परिषद, औरंगाबाद
          तुम्ही किसानपुत्र आहात, संवेदनशील आहात. शेतकरी आत्महत्त्या व एकूणच शेती व शेतकऱ्यांच्या  समस्यांमुळे तुम्ही चिंतीत आहात. शृजक शेतकरी   राष्ट्रसंपतीचा खरा  निर्मीता, करोडो देशवासियांचा अन्नदाता, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे  आज देशोधडीला लागला आहे. अस्मानी व सुलतानी संकटांनी जर्जर झाला आहे. आयात निर्यात   धोरण, सिलिंग, जमीन अधिगृहण, गोवंश हत्त्या बंदीअत्यावशक वस्तू कायदा, शेडूल नऊ, इत्यादी  अनेक कायद्यांनी शेतीचे  शेतकऱ्यांचे  बेमालूमपणे शोषण करून त्यांचे जगणे नामोहरम  केले आहे. यामुळे शेतकरी खचला आहे व तो आत्महत्येस प्रवृर्त होत आहे. यामुळे प्रत्येक संवेदनशील भारतीय चिंतीत आहे, अस्वस्थ आहे. हे सर्व शेतकरी विरोधी  धोरणाचे  परिणाम आहेत. शेतकरी विरोधी धोरण समजून घेण्यासाठी आणि  मा. शरद जोशी यांच्या विचारांची प्रेरणा घेउन शेतकऱ्यांच्या पायातील शेतकरीविरोधी कायद्याच्या बेड्यावर घाव घालण्यासाठी आता किसानपुत्र सरसावले आहेत.
       आपणासही  शेतकऱ्यांसाठी   काही करावेसे वाटत असेल तर तुम्हाला हे शेतकरीविरोधी कायदे समजून घ्यावे लागतील. किसानपुत्रांसह सर्वांनी या शेतकरीविरोधी कायद्यांची माहिती मिळावी म्हणून औरंगाबाद येथे शेतकरीविरोधी कायदे परिषद आयोजित करण्यात आली  आहे.  प्रवेश मोफत परंतु मर्यादित असून  सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.  
प्रमुख वक्ते- अॅड. दिनेश शर्मा, अॅड. महेश भोसले, अॅड. प्रकाशसिंह पाटील.
दिनांक -- 19 एप्रिल 2016 मंगळवार, सकाळी 10.30 वा.

स्थळ- यशवंतराव चव्हाण सभागृह, म.सा.प. परिसर, पैठण गेट, औरंगाबाद

-:संयोजक :-

किसानपुत्र  आंदोलन, औरंगाबाद आणि  शेतकरी संघटना औरंगाबाद

प्रा.  डा. राम चव्हाण     श्री. कैलाश तवार        अड.निनाद पाटील      श्री शशिकांत वडले
९४२३३५५२९२           ९४२२३६२७२६         ९४२३७८७९४०        ९४०४०४२७३८