शनिवार, २ मार्च, २०१३

काय लिहावे असे सतत  वाटल्या मुळे बरेच काही लिहिणे राहूण गेले. पण एक मात्र खरे कि माणूस हा सामाजिक प्राणी असल्या मुळे त्याला सतत कोणाशी तरी बोलावेशे  वाटते. माझ्या मते संवाद हा मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यावरचा अत्यंत महत्वा अविष्कार आहे . कदाचित रानाटी  अवस्थेत भिती किंवा गरजेतून संवादाला  सुरुवात झाली आसावी, पण हळूहळू संवाद वाढत  गेला अन ती भावणिक गरज  निर्माण झाल्या मुळे  कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली असावी . त्यातून पुढे टोळी किंवा समुदाय हा पुढला टप्पा विकसित होताना  भाषा आणि संवादाचे महत्व टिकून रहिले. नातेवाईक आप्त इष्ट कुटुंबातील इतर सदस्य यांच्यातील संवाद मानवी संबंधांचे जाले विणत गेला. मागील काळात घड्याळ नव्हते परंतू वेळ होता, आज घड्याळ आहे पण वेळ नाही. म्हणून बोलणे नाही संवाद नहि. त्यातच टिव्ही, इंटरनेट व  मोबाईल मुले घरात सुद्धा कोनी  एकमेकाशि बोलेनाशे झाले आहे.  कुटे तरी एकटेपणाकडे माणसाची वाटचाल होते आहे अशी भीती  वाटते    आहे. म्हणून हे  मुक्तांगण ---------- सर्वांना गप्पा मारण्या साठी निवांत व सतत उपलब्ध असणारा कट्टा ---------या आपण पुन्हा बोलत राहू सुख -दु:ख वाटून घेऊ----चला बोलते होऊ ………. ………………. राम चव्हाण